Monday, September 7, 2009

आयुष्यात एकदातरी आठ्वा ते दिवस

आयुष्यात एकदातरी आठ्वा ते दिवस,
कधीतरी, पण आयुष्यात एकदातरी

कोलेज संपल्यानंतर आठ्वणी जाग्या होतात
मनांत भावनांच्या गर्दी करतात,
आणि मग ह्रदयातील भावना ओथंबून वाहतात,
आठ्वणींच्या हिरवळी पुन्हा डोळ्यात उभ्या राहतात

आयुष्यात एकदातरी आठ्वा ते दिवस,
कधीतरी, पण आयुष्यात एकदातरी

आठ्वा ते दिवस बहरलेले,
आठ्वा ते कोलेज गर्दीने फ़ुललेले,
आठ्वा ते लेक्चर गप्पागोष्टीत रंगलेले,
आठ्वा ते सवंगडी मैत्रीच्या गोड नात्यात गुंफ़लेले.

आयुष्यात एकदातरी आठ्वा ते दिवस,
कधीतरी, पण आयुष्यात एकदातरी

आणि मग आपण आठवणींच्या या फ़ांदीवरून
त्या फ़ांदीवर उड्या मारत राहतो
पण काळ मात्र वेगळाच खेळ खेळतो
आणि एखादी फ़ांदीच तोडून टाकतो
आणि....
आणि मग आठवणी फ़ुलं हौऊन पडतात
भूतकाळात जमा होतात
म्हणूनच सांगतो,

आयुष्यात एकदातरी आठ्वा ते दिवस,
कधीतरी, पण आयुष्यात एकदातरी

पण तरीही त्या कधीतरी पुन्हा मनांत डोकावतात
आणि पुन्हा आपण जळत राहतो आठवणींच्या त्या मुसळधार पावसात.

आयुष्यात एकदातरी, फ़क्त एकदातरी आठ्वा ते दिवस...
----------------------- मंगेश पाडगावकर.

No comments:

Post a Comment