Thursday, October 29, 2009

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी

क्षणोक्षणी चुका घडतात,

आणि श्रेय हरवून बसतात.

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला

फार काही शिकवत असतात.


कणभर चुकीलाही

आभाळाएवढी सजा असते,

चुक आणि शिक्षा यांची कधी

ताळेबंदी मांडायची नसते


एक कृती, एक शब्द

एकच निमिष हुकतं-हुकतं

उभ्या जन्माच्या चुकामुकीला

तेवढं एक निमित्त पुरतं

अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी

आपण मात्र शिकत असतो

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

- सुधीर मोघे

संक्षेप

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला!

वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला

चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!


केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला


बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
“बाहेर एक कैदी तारा धरून गेला!”

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!

- ( एल्गार ) सुरेश भट

आता वाटतं

आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला

आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला

एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस

आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला

आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,

कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे !

काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा

अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे …

आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला


थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही

आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास

प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !

भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा !

बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा !

झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात

पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !

पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो

यावर आता विश्वास ठेवायचा फक्त …

हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे

थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,

आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

शपथ सुटली म्हण!
गोष्ट फिटली म्हण!
मला ओळखू दे आधी
मग म्हणायचे ते म्हण!!

आभाळ भरलं आहे
वारा पडला आहे
आधी उपचार म्हणून मल्हार
मग मरवा म्हण!!

शिळेवर बसलो आहे
शिळेसारखा सारखा बसलो आहे
!
शिळेवर गुणगुणतो जुनीच दुख्खे
तू काही नवीन म्हण!!

थोड़े म्हणायचे म्हण
थोड़े ना म्हणायचे म्हण
!
गाणे संपताना तरी
सम गाठली म्हण!!
- मौनाची भाषांतरे, संदीप खरे
नुकत्याच कविता लिहु लागलेल्या
अशक्त मुलाच्या आई वडिलांना डॉक्टरने सांगितले,
आता लिहायला लागलाच आहे, तर लिहु दे त्याला कविता,
टॉनिक वगैरे देतो मी
पण शक्यतो कविता लिहण्याची वेळ त्याच्यावर न आणलीत तर बरं!

जगणं सुंदर असल्याचं सिद्ध करता आलं
तर अवश्य दाखवा करुन..
कारण मृत्युच्या लेण्यांमधलं गुढ, सुंदर धुकं
त्याच्या मनात दाटलयं अगदी जन्मापासुन!

नाती, मित्र, प्रेम, मारवा, पैसा..
सगळ्यावर ठेचा खाईलच तो यथावकाश
फळ पिकण्या आधीच घाई नको शक्यतो
वा भरावं त्याचं पोट म्हणुन उपास तापास!!

शहाण्यासारखा लिहतो म्हणुन
शहाणा म्हणण्याची नको घाई…
तो लिहतो त्याच्यावरुनच
त्याचाच उडतो विश्वास
सुकण्या आधी शाई!!!

थोटे पडतील हात पाय.. घरामध्ये खचतेच भुई
साता जन्माचे पापग्रह नाचत राहतील थुई थुई
दिवसा झोप, रात्री जाग असे होवुन जाईल घर…
बोलुनसुद्धा उपयोग नाही, तो असेल रानभर

मुळातच उपचार कमीच या रोगाला
तुम्ही नाही तर दुसरं एखादं कारण असेलच हजर
त्यातुनही वाढलच तर वाढु दे हे दुखणं
यातुनच ओसंडत येतो एखादा ज्ञानेश्वर!!

- मौनाची भाषांतरे, संदीप खरे

Tuesday, October 27, 2009

शेवटचीच भेट दोघांची... उरल्यासुरल्या पुण्याईने मिळालेला ३-४ प्रहरांचा एकांत...
परिस्थिती अशी की आता हे एकमेकांत समरसून जाणं पुन्हा नशिबी नाही हे दोघांनाही उमगलेलं...
आपापली आयुष्यं खांद्यावर घेऊन दोन वाटांनी निघून जाण्यापूवीर् एकमेकांना भरभरून देण्याघेण्याची जीवघेणी धडपड. ही भेट 'मनस्वी' सुद्धा... 'देहस्वी'सुद्धा- पण 'आता पुन्हा कधीच नाही' हे वाक्य घड्याळ्याच्या लंबकासारखं प्रत्येक क्षणावर टोले देत राहतं... स्पर्शाच्या रेशमी मोरपिसांचे चटकेच मनावर उतरतात.
गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे;
माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने...

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त;
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला;
होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा...
गीत-आरती प्रभू
संगीत-पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर-आशा भोसले